1raju_shetti_16june_27.jpg
1raju_shetti_16june_27.jpg

राजू शेट्टी म्हणाले, 'हा लढा नक्की यशस्वी होईल'

कोरोनाच्या काळातील वीज बिल माफ व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारला आहे. 'हा लढा नक्की यशस्वी होईल' असं राजू शेट्टी यांना वाटत आहे.

पुणे : "जेव्हा एखादा लढा कोल्हापुरात उभा राहतो तेव्हा तो यशस्वी होतो. घरगुती वीज ग्राहकांचे बिल माफ व्हावे, यासाठी हा लढा आम्ही कोल्हापुरातून उभा केला आहे. तो राज्यात पोहोचेल. या लढयात आम्हाला यश मिळेल," असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

कोरोनाच्या काळातील वीज बिल माफ व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढा उभारला आहे. 'हा लढा नक्की यशस्वी होईल' असं राजू शेट्टी यांना वाटत आहे. त्यांनी तसा विश्वास व्यक्त केला आहे. "कोल्हापूरची परंपरा लढ्याची आहे. जेव्हा एखादा लढा कोल्हापुरात उभा राहतो तेव्हा तो लढा यशस्वी होतो," अस त्यांनी म्हटले आहे.

"ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी कोल्हापुरात टोलचे आंदोलन सुरू केले ते यशस्वी झाले. राज्यात कोठेही टोल बंद झाला नाही, पण कोल्हापुरात बंद झाला आहे. आम्हीही अंकली पुलावरील टोल बंद केला आहे. टोलची लढाई आम्ही जिंकलेली आहे," असे शेट्टी म्हणाले.

"कोरोनाच्या काळात सगळे काम धंदे बंद असल्याने लोकांना कसलेही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे लोक वीज बिल भरू शकत नाहीत तरी महावितरणने घरगुती वीज बिले माफ करावीत, अशा प्रकारची माफी पहिल्यांदाच मिळणार आहे. आणि अशी माफी देणे काहीच चुकीचे नाही, " असे शेट्टी म्हणाले. "आम्ही कोल्हापूरच्या मातीत जे लढे उभा केले ते राज्यभर पोहोचले. लोकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला. हाही लढा राज्यभर जाईल."असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
 Edited  by : Mangesh Mahale   


हेही वाचा: राऊत म्हणाले, "माफी मागण्याचा विचार करेन.." 
मुंबई : "सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत माफी मागण्याच्या विचार करेन, प्रसारमाध्यमांनी यात पडू नये," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. इथं जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जातंय. सुशांतसिंह प्रकरणात राजकारन न करता, राज्य, देश कसा पुढे जाईल, याचा विचार आपण केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.  सुशांतसिंह प्रकरणामुळे राज्य सरकार अस्थिर असून ते पडेल का या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणले, "सरकार अजिबात अस्थिर नसून ते पडणार नाही. जर असे झाले तर अगोदर केंद्र सरकार पडेल. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिसच सक्षम आहे. ते हा तपास पुढे नेतील. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांतसिंह प्रकरणाच्या नोटिशीची मला कल्पना नाही. आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही. आम्ही सर्व एक आहोत, असे राऊत यांनी नमूद केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com