मुरूंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच;पाच हजार कोंबड्या मारण्याचे आदेश

मुरुंबा गाव परिसरातील १ किलोमीटर पर्यंतचे पाळीव पक्षी नष्ट केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. दहा किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्षांची ने-आन,खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Bird Flue news parbhani
Bird Flue news parbhani

परभणी : मुरुंबा (ता. परभणी) येथे ८००  कोंबड्यांचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू  'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुरंबा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गावातील ४ ते ५ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मुरुंबा गावातील ८०० कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे स्वब भोपाळ येथे पाठवण्यात आले ज्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

मुरुंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लुने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे.  या गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. मुरूंबा (ता.परभणी) गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात पशूसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. 

गावातील तीस जणांचे नमुने घेतले..

गावातील पोल्ट्रीफॉर्म मधील कोंबड्यामध्ये बर्ड फ्लू आढळून आल्यानंतर गावात सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पोल्ट्रीफॉर्म वर काम करणारे व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांचे स्वँब H5N1 तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मुरंबा गावातील कोंबड्यांमध्ये H5N1 या विषाणूची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा परिणाम चिकन मार्केटवर आढळून आला आहे.

दरम्यान मुरुंबा गाव परिसरातील १ किलोमीटर पर्यंतचे पाळीव पक्षी नष्ट केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.  दहा किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्षांची ने-आन,खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com