अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे आम्ही स्वागत करतो : प्रवीण कुंटे पाटील

अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही.
Pravin Kunte Patil
Pravin Kunte Patil

नागपूर : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण वैयक्तिक आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयानेही काही संबंध नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आज दिवसभरात जे काही चालविले आहे, त्याचा काही एक फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे गोस्वामींच्या अटकेचे आम्ही स्वागत करतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील म्हणाले. 

सरकारने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला केला आहे, अशी जी काही ओरड केली जात आहे. त्यात काही दम नाही. कारण प्रामाणिकपणे आपले काम करणारे पत्रकारही या प्रकरणात गोस्वामींच्या सोबत उभे राहीले नाही. पोलिसांनी जी कारवाई केली, ती एका गुन्ह्याच्या तपासात केली आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात कितीही ओरडल्याने काहीही होणार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या या मंडळींकडे जनतेनेही दुर्लक्ष करणे शिकून घेतले आहे. आज दिवसभरात या लोकांनी जो आकांडतांडव केला, त्यामुळे यांना असे वाटत आहे की, महाविकास आघाडीचे सरकार पडेल, पण हे सरकारचा पाया भक्कम आहे. त्यामुळे हे त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरणार आहे. 

मे २०१८ मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती. पण तो ती देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 

अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांचे समर्थन कदापिही योग्य नाही. कायद्याला त्याचे काम करू देणे, हेच योग्य ठरेल. सरकार आपले काम योग्यरित्या करीत आहे. सरकारच्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, असे प्रवीण कुंटे पाटील म्हणाले.     (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com