"राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही सरकार पाडण्याचा प्रयत्न, पण...?' 

उद्या चालून महाराष्ट्रातही हा प्रयोग केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. किंबहुना तो सुरू झाला आहे. पण महाविकास आघाडी येथे त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, हे मात्र मी विश्‍वासाने सांगू शकतो.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : ज्या-ज्या राज्यांत भाजपचे सरकार नाही, तेथे ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून आणि पैशांचे आमिष दाखवून केंद्रातील सरकार आणि भारतीय जनता पक्ष मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही हा प्रकार केला जात आहे. सोबतच महाराष्ट्रातही सरकार पाडण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण हा महाराष्ट्र आहे, येथे महाराष्ट्र विकास आघाडी त्यांचा प्रयत्न कुठल्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो, असे राज्याचे उर्जामंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आज "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

डॉ. राऊत म्हणाले, कारण राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सरकार जनतेच्या उच्वल भवितव्यासाठी स्थापन झाली आहे. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, असे मला वाटत नाही. संपूण देश कोरोच्या महायुद्धात लढतो आहे. देशात प्रचंड आर्थिक तणाव निर्माण झाला आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि अशा स्थितीत समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याची जबाबदारी केंद्र सरकावर आहे. अशा संकटसमयी त्यांचा हा प्रयोग लोकशाहीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, भाजपने हा प्रयोग करू नये आणि कोरोनाच्या लढ्यावर लक्ष केंद्रीत करावे. 

यापूर्वी कर्नाटकमध्ये 100-100 कोटी रुपयांना आमदार खरेदी केले गेले आहेत. शेवटी पैसा सर्वांनाच प्रिय आहे. त्यामुळे त्यांचे फावते आहे. जे पैसे देऊन मानत नाहीत, त्यांना ईडीच्या कारवाईचा धाक दाखवला जातो. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी गुजरातमध्ये 25-25 कोटी रुपयांना आमदार विकत घेण्याचं काम भाजपने केले. त्यापुर्वी मध्यप्रदेशची सरकार पाडताना त्यांनी हेच काम केलं. आता तोच प्रयोग राजस्थानमध्ये केला जातोय. लोकशाहीमध्ये पैशांचा, बळाचा वापर करुन त्यांना नामोहरम करुन करण्याचा केले जात आहे. हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि संविधानालाही छेद देणारे असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. 

राजस्थानमध्ये आमदारांवर ईडीचा दबाव आहे. अनेकांच्या घरांवर धाडी पडल्या आहेत. राजस्थानचे सरकार सद्यस्थितीत मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या नेतृत्वात कायम आहे. उद्या चालून महाराष्ट्रातही हा प्रयोग केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. किंबहुना तो सुरू झाला आहे. पण महाविकास आघाडी येथे त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, हे मात्र मी विश्‍वासाने सांगू शकतो, असे डॉ. राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com