बावनकुळे संतापले; म्हणाले... तर आम्ही सरकारला सोडणार नाही !

रकार जेव्हा बदलायचे असेल तेव्हा बदलेल किंवा नाहीही बदलले तरी आमची तयारी २०२४ ची आहे आणि जोरात सुरू आहे. आज ना उद्या चंद्रकांत दादा मोठ्या पदावर जाणारच आहेत.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश महिनाभरापूर्वी काढला असता, तर कदाचित आत्ता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ZP elections ओबीसींना त्याचा फायदा झाला असता. पण आता ते होईल, असे वाटत नाही. सरकारने बोलल्याप्रमाणे या निवडणुका रोखून दाखवाव्या, असे आव्हान ओबीसी नेते आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे OBC Leader Chandrashekhar Bawankule यांनी दिले आहे. आता जर हा अध्यादेश टिकवला नाही, तर मग आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयासमोर गेले असते, तर या पोटनिवडणुका लागल्या नसत्या. पुढील निवडणुकीपर्यत अध्यादेश टिकवायचा असेल तर सरकारला न्यायालयात यासंबंधी सांगावे लागेल. ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने देशातील सर्वोत्तम वकील लावून अध्यादेश टिकवला पाहिजे. नाही टिकवला तर सरकारमध्ये असलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी अध्यादेश टिकू दिला नाही, असा याचा अर्थ होईल, असे बावनकुळे म्हणाले.

ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ट्रिपल टेस्ट करावी, याची माहिती सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वीच दिली आहे. सरकारने ट्रिपल टेस्ट न करताच अध्यादेश काढला. त्यामुळे आता अध्यादेश टिकला नाही तर ओबीसी समाज ऐकून घेणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. १८ महिने सरकार उदासीन राहिले आणि निवडणुका जाहीर होताच अध्यादेश काढला. आरक्षण द्यायचे सरकारच्या मनात असते तर सरकार १८ महिने उदासीन राहिलेच नसते असा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी बोलावे आणि निवडणुका थांबवाव्या. या निवडणुका थांबल्या, तर या अध्यादेशाला अर्थ आहे. म्हणून सरकारने आता ‘टेक्निकल, टेक्निकल..’ करत पुन्हा वेळ वाया घालवू नये आणि लोकांना मूर्ख बनवू नये, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. 

चंद्रकांत दाद मोठ्या पदावर जातील...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानानंतर सरकार बदलेल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत विचारले असता, सरकार जेव्हा बदलायचे असेल तेव्हा बदलेल किंवा नाहीही बदलले तरी आमची तयारी २०२४ ची आहे आणि जोरात सुरू आहे. आज ना उद्या चंद्रकांत दादा मोठ्या पदावर जाणारच आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले विधान चुकीचे नाहीच, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांचे समर्थन केले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com