नगर जिल्ह्यात 24 वाढले, 37 जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 369 असून, उपचार घेत असलेले रुग्ण 149 आहेत. तसेच एकूण रुग्ण संख्या 533 झाली.
3Corona_20Sakal_20times_2.jpg
3Corona_20Sakal_20times_2.jpg

नगर : जिल्ह्यात आज 24 रुग्णांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. तर 37 जण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे. 24 पैकी 14 रुग्ण नगर शहरातील आहेत. इतर रुग्ण शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, पारनेर, राहुरी, श्रीगोंदे तालुक्यातील आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नगर शहरात विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून, बहुतेक भाग हाॅटस्पाॅट जाहीर करण्यात आला आहे.

नगर शहरातील 14 अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामध्ये सिद्धार्थनगरमधील 5, पद्मानगरमधील 3, नालेगावातील 2, दसरेनगर येथील 1, चितळेरोडवरील 1, भिंगारमधील 2, अवसरकर मळा, सारसनगर येथील 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. याबरोबरच संगमनेर तालुक्यातील कुरण आणि शहरातील दोन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील 1, राहाता तालक्यातील दाढ बुद्रुक येथील 1, ताथर्डी तालुक्यातील खेरडे येथील 1, पारनेर तालुक्यादील भोंदरे येथील एक, राहुरी तालुक्यातील केसावूर गावातील 1, तर श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 37 असून, त्यात नगर शहरातील 32, अकोले तालुक्यातील 2, जामखेड, राहाता, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 369 असून, उपचार घेत असलेले रुग्ण 149 आहेत. तसेच एकूण रुग्ण संख्या 533 झाली असल्याचे जिल्हा रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळी 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी आलेल्या अहवालातील ही आकडेवारी असल्याचे नोडल अधिकारी डाॅ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

दरम्यान, कोरोनाचा आकडा वाढत असला, तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगली आहे. कोरोनावर हे रुग्ण मात करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधणकारक असून, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, ज्येष्ठ व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास पूर्ण बंदी असून, 10 वर्षाखालील बालकांनाही गर्दीच्या ठिकाणी नेता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहेत. मात्र भाजीबाजार, दुकानांमध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कोरोना वाॅरिअर यांना सन्मानाची वागणूक द्यावी, असेही अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com