भाजप सत्तेपासून दूर राहिल्याचे मुनगंटीवर यांनी हे सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यातून प्रत्येक नागरिक उभा राहील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
mungantivar.jpg
mungantivar.jpg

अकोले  : सत्तेसाठी हापापलेल्या मित्रपक्षाने पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी लोकशाहीचा अवमान केला. राज्यात जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट काैल दिलेला असतानाही केवळ त्यांच्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही, अशी टीका माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यातून प्रत्येक नागरिक उभा राहील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

भाजपर्फे आज व्हर्च्युअल सभा व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुनगंटीवार यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. माजी आमदार वैभव पिचड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ऑनलाइन उपस्थित होते. 

मुनगंटीवार म्हणाले, "कोरोनाच्या काळात भारताने जगाचे नेतृत्त्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे हे शक्य झाले आहे. कोरोनाच्या संकटात इतर देशांना भारताने मदत केली आहे. कोरोना हे जागतिक संकट असताना भारताने जगाला आपला वेगळा संदेश दिला आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी भारताने चांगले प्रयत्न केले आहेत. हे केवळ मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे.'' 

मधुकर पिचड यांचे काैतुक

आदिवासीच्या उन्नतीसाठी योगदान देऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी लिलया सोडविले. त्यांचे पूत्र माजी आमदार वैभव पिचडही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. दोघाही पिता-पुत्राचे काम गाैरवास्पद असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी हेच देशाचे खंबीर नेतृत्व करू शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगात महासत्ता होऊ शकतो, असा विश्वास माजी मंत्री पिचड यांनी व्यक्त केला.

व्हर्च्युअल सभेची उत्सुकता 

व्हर्च्युअल सभेबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. मुनगंटीवार हे चंद्रपूर येथून, मधुकर पिचड हे राजूर, राजेंद्र गोंदकर हे शिर्डी, तर वैभव पिचड व कार्यकर्ते अकोले येथून ऑनलाइन सभेला उपस्थित होते. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. केंद्र सरकार करीत असलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांना दिली पाहिजे, केंद्राच्या अनेक योजना आहेत, त्या गरिबांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला वेगळा संदेश दिला आहे. त्याबाबतची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी समाजात सांगावी, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांनीही समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. केंद्र शासनाने काय कामे केली, याची माहिती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळावी, त्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com