आमदार डाॅ. किरण लहामटे यांना वैभव पिचड यांचे हे खुले आव्हान

आगामी नगरपंचायतचीनिवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे.मित्रपक्षाने अजूनपर्यंत विचारणा केलेली नाही. तशी वेळ आल्यास त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.
lahamte and pichad.png
lahamte and pichad.png

अकोले : सध्याचे आमदार लोकहिताच्या गप्पा मारतात. परंतु लोकहिताची कामे करत नाहीत. गेल्या वर्षभराच्या संकल्पपूर्तीमध्ये निवडणुकीत यांनी किती आश्वासने दिलेली वास्तवात उतरली आहेत, याचा लेखाजोखा सर्वांच्या पुढे आणावा, असे खुले आव्हान माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी पत्रकारांसी बोलताना दिले.

आगामी नगरपंचायतची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार आहे. मित्रपक्षाने अजूनपर्यंत विचारणा केलेली नाही. तशी वेळ आल्यास त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.

पिचड म्हणाले, की आपल्या काळातील मंजूर कामांचे उद्घाटन सध्याचे आमदार घेत असून, खरे म्हणजे त्यांनी मंजूर कामाची तारीख किंवा तसा फलक कामाच्या ठिकाणी उभा करण्याची नितांत गरज आहे, असा टोला पिचड यांनी लगावला.

पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत ते म्हणाले, की पक्ष सोडून जाणाऱ्यांशी चर्चा करून मनधरणी केली, मात्र त्यांचा भाजप सोडण्याचा निर्णय ठाम होता. निवडणुकीत माझा प्रचार केला, आणि मी जर आमदार झालो असतो, तर हे पक्ष सोडून गेले असते का ?असा सवाल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी करीत शेवटी कोणाची मनधरणी किती करायची, यालाही मर्यादा आहेत. माझ्यावर विश्वास असलेले माझे सखे सोबती माझ्याबरोबर आहेत, निश्चितच या पुढे जोमाने सर्वजण काम करतील, असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला.

भाजपची नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी ही सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवतील. कोरोना व इतर सर्व बाबींचा विचार करण्यास वेळ लागला म्हणून ही कार्यकारिणीची निवड करण्यास उशीर झाला आहे. जुन्या नव्यांचा ताळमेळ बसविताना व पद मर्यादा कमी असल्याने काही नाराज असतील परंतु ते संयमी असल्याने येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व एकदिलाने काम करणार असून, भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीच्या कमी निधीला आमदारच जबाबदार

मोदी सरकारची ही दुसरी टर्म असून, त्यांनी शेतकर्‍यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने तालुक्यासाठी काहीही मदत केली नाही. ग्रामपंचायतीचा विकास कामांचा निधी राज्य शासनाने परत घेतला. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यामध्ये राजकारण आणून खोडा घातला. अतिवृष्टीची निधी कमी आला याला. आमदार जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

नगरपंचायतने करोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले. तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याने कोविड सेंटर उभारून औषधेही उपलब्ध करून दिली. मात्र लोकप्रतिनिधी व शासन तालुक्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कमी पडले आहे. तालुक्यातील सर्व संस्था ह्या चांगले काम करीत असून, या पुढेही अतिशय जोमाने काम चालू राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com