पाहणी, पंचनामे सोडा, अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांना सरसकट मदत द्या

अतिवृष्टी, महापूर हे संकट जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आले आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.
rajesh parjane.jpg
rajesh parjane.jpg

नगर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मोठा खर्च करून पिकविलेल्या कांदा पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणणारे ठरले आहे. उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे, पाहणी दाैरे करीत बसण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने सरकट मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती दिली आहे. अतिवृष्टी, महापूर हे संकट जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आले आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, बाजरी, उडीद,तूर, मूग, कांदा, बटाटा, भात, ऊस तसेच फळबागांचे मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे. 

सरकारने पंचनामे किंवा पाहणी करण्यापेक्षा थेट सर्व शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी परजणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com