घाटघर प्रकल्पग्रस्तांसाठी जयंत पाटील यांचे हे मोठे आश्वासन

आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनास अखेर यश मिळाले आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनादिले.
jayat patil.png
jayat patil.png

अकोले : आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनास अखेर यश मिळाले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आपल्या हक्काच्या मागण्या, संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी केटीवेअरमधुन पाणी द्यावे, इतर मागण्यांसाठी सतत आंदोलन सुरू होते, मात्र सरकार गांभिर्याने दखल घेत नसल्याने ता. ५ आॅगष्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करीत विद्युतनिर्मिती चाक बंद केले. त्यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी आंदोलनकर्त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काल (मंगळवारी) संबंधितांमध्ये बैठक झाली व आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले, अशी माहिती देविदास खडके यांनी दिली.

या आदिवासी शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनकर्त्यानी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुरावा मिळालेले यश आहे, असे मत धोंडीबा सोंगळ यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com