हनी ट्रॅप ! आता शंभरी भरलीय, `त्यांची` पोलिस चाैकशी सुरू

जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात उत्सुकता असलेल्या बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणातील`त्या` लोकांची आता शंभऱी भरली आहे.पोलिस चौकशी अखेर सुरू झाली. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी त्याबाबतचा आदेश दिला आहे.
hunny trap 4
hunny trap 4

नगर : जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात उत्सुकता असलेल्या बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणातील `त्या` लोकांची आता शंभऱी भरली आहे. पोलिस चौकशी अखेर सुरू झाली. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी त्याबाबतचा आदेश दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

"सकाळ'ने या प्रकरणाचा केलेला पाठपुरावा, तसेच आमदार संग्राम जगताप यांनी या संदर्भातील चौकशीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेले पत्र, या बाबींची दखल घेऊन ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनीही मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह संबंधितांकडे याबाबतच्या चौकशीही मागणी केली होती. 

व्यापारी, अधिकाऱ्यांसह बड्या व्यक्ती व धनिकांना महिलांच्या माध्यमातून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेलिंग करायचे व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचे, म्हणजेच "हनी ट्रॅप' करण्याचे प्रकार नगर शहर व जिल्ह्यात सुरू असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले. गेले दोन आठवडे "सकाळ'ने या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे काम चालविले आहे. "सकाळ', ई-सकाळ व सरकारनामा या सकाळ माध्यम समूहाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे वृत्त जगभर पोचले. त्याबाबत विविध स्तरांवर चर्चाही झडत आहे. 

"हनी ट्रॅप' प्रकरणात ट्रॅप करणारे व त्यामध्ये फसणारे दोन्ही लाभार्थी असतात. त्यात फसले गेलेल्यांना इज्जतीची मोठी काळजी. त्यामुळे फसवणूक होऊनही फिर्याद देण्यास कोणीही पुढे येत नाही. परिणामी, पोलिसांना कारवाईस मर्यादा पडत आहेत, ही बाबही "सकाळ'ने मांडली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे चौकशीची मागणी केली होती. आमदार संग्राम जगताप यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य, त्यामध्ये अडकलेली मंडळी, "हनी ट्रॅप' करणाऱ्या टोळीतील सदस्यांच्या "उद्योगां'ची माहिती गृहमंत्र्यांच्या कानावर घातली होती. या समाजविघातक प्रकरणाचे पडसाद समाजात अत्यंत वाईट पद्धतीने उमटत असल्याचेही जगताप यांनी गृहमंत्र्यांना सांगून, याबाबतच्या चौकशीची मागणी केली होती. 

"सकाळ'चा पाठपुरावा व लोकप्रतिनिधींचा रेटा, या बाबींची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ अधिकारी ही चौकशी करणार आहेत. या प्रकरणात कोण कोण गुंतले आहेत, किती लोक फसले आहेत, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे, हनी ट्रॅपचे प्रकार करणाऱ्या टोळीने कुठे कुठे गुन्हे केलेले आहेत, त्यामध्ये कुठल्या महिला व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांचा उपयोग करण्यात आला, या बाबींचा उलगडा चौकशीनंतर होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. दरम्यान, "हनी ट्रॅप'बाबत चौकशी करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 
 

अद्याप फिर्याद नाही, परंतु चाैकशीचे आदेश : अखिलेश कुमार सिंह

हनी ट्रॅप प्रकरणाच्या बातम्या येत आहेत. तथापि, त्या संदर्भात अद्याप कोणाचीही फिर्याद नाही. त्यामुळे कारवाईला मर्यादा येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मात्र देण्यात आले आहेत, असे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले.

इज्जतीपोटी पुढे येत नाही : अष्टेकर

इज्जतीच्या भीतीपोटी "हनी ट्रॅप' प्रकरणात फसूनही फिर्याद द्यायला कोणी पुढे येत नाही. लोकशाहीतील ही शोकांतिका आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली, ही चांगली बाब आहे. त्यातून सत्यशोधन होऊन संबंधितांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com