नात्याला काळीमा ! चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचार

कोळगाव येथील 18 वर्षीय आरोपीने त्याच्या चुलत बहिणीवर नजर ठेवून पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिस निरीक्षक माने यांनी माहिती घेत दौंड गाठले. त्या आरोपीने अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले.
balatkar
balatkar

श्रीगोंदे : सोळा वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीला प्रेमाचे आमिष दाखविले आणि फूस लावून कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथून पळवून नेले. दौड येथील जुन्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने संबंधित युवकाला अटक केली असून, मुलीला आईच्या ताब्यात दिले आहे. 

कोळगाव येथील 18 वर्षीय आरोपीने त्याच्या चुलत बहिणीवर नजर ठेवून पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिस निरीक्षक माने यांनी माहिती घेत दौंड गाठले. त्या आरोपीने अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतला आहे. याबाबत अपहरण, बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात श्रीगोंदे तालुक्यातील गुन्हेगारी काही अंशी थांबली होती, तथापि, आता पुन्हा डोके वर काढले आहे. गुन्हेगारी विश्वातून असे नात्याला काळीमा फासणारे प्रकार होत आहेत. अशा घटनांमुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरत असून, अशा माथेफिरू व्यक्तीच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा...

अंगणवाडी सेविकांची क्वारंटाईन कक्षातील नेमणूक रद्द करावी 

श्रीरामपूर : राज्यातील अंगणवाडी सेविकांना नियमित कामांचा भार असून, त्यात सध्या कोरोनाबाधितांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासनाकडून कुठलीही उपकरणे पुरविली जात नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आहे. त्यांची क्वारंटाईन कक्षातील नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र बावके यांनी केली आहे. 

सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्याच्या विविध शहरांतून ग्रामीण भागात अनेक नागरिक आले आहेत. त्यांतील अनेक जण मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा "रेड झोन'मधून आल्याने गावागावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून शाळेत अथवा अन्य ठिकाणी क्वारंटाईन केले जाते. त्यांच्या देखभालीसाठी अंगणवाडी सेविकांना नेमले जाते. प्रारंभी त्यांना 12 तास व रात्रीची नेमणूक दिली होती. संघटनेने त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्रीची नेमणूक व कामाच्या स्वरूपात बदल झाला. 

मात्र, प्रशासनाकडून त्यांना सुरक्षिततेसाठी कुठलीच उपकरणे पुरविली जात नाहीत. अंगणवाडी सेविकांचा संपर्क थेट क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींशी येतो. क्वारंटाईन केलेल्या अनेकांना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातही हलविले जाते. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपकरणांअभावी अंगणवाडी सेविकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून तत्काळ विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा त्यांची क्वारंटाईन कक्षातील नेमणूक रद्द करावी, अशी मागणी बावके यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com