अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या 10 हजार कोटी मदतीचे काॅंग्रेसकडून स्वागत

राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये,मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे.
balasahebh-thorat-ff.jpg
balasahebh-thorat-ff.jpg

नगर : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज जाहीर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्वागत करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले, की राज्य सरकारने पिकांचे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये,मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. फळपीक नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये, रस्ते आणि पुलांसाठी 2 हजार 635 कोटी, ग्रामीण रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी 1 हजार कोटी, नगर विकासासाठी 300 कोटी, महावितरण उर्जा विभागासाठी 239 कोटी, जलसंपदा विभागासाठी 102 कोटी रुपये, कृषी, शेती, घरांसाठी 5 हजार 500 कोटी रुपये असे एकूण 9 हजार 776 कोटी रुपयांचे हे मदत पॅकेज आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास मोठी मदत होणार आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक अजूनही आलेले नाही. कोरोनामुळे राज्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. केंद्र सरकारकडून हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीतही शेतकर्‍याला वार्‍यावर न सोडता ही भरीव मदत राज्य सरकारने जाहीर केली असून, दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. संकटकाळात राज्यसरकार शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com