मुलांचं नुकसान होतंय, मराठा आरक्षणाचं आताच बोला : छत्रपती संभाजीराजे

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द केल्याबाबत संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका केली.
Sambhaji raje 1.jpg
Sambhaji raje 1.jpg

पुणे : मराठा आरक्षणाबाबत चालढकल होता कामा नये. 102 च्या घटनादुरुस्तीबाबत समिती नेमलेली आहे. त्यांनी अहवाल तातडीने द्यावा. समाजातील मुलांचे मोठे नुकसान होत आहे. काय निकाल लावायचा ते आताच लावा, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथे माध्यमांशी बोलताना मांडले.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रदद्द केल्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले की मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहु महाराजांची भूमिका मांडली आहे. 2013 ला माझ्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला. त्या वेळी मिळालेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर 50 लाख लोकांना पटवून सांगितले, की काहीतरी गालबोट लागू शकते. झाले तसेच. सरकारने जी भूमिका घेतली, ती विचार करायला लावणारी आहे.  न्यायाधिशांनी जी स्थगिती दिला, त्या वेळी सरकारला वाटले, की वकिलांच्या माध्यमातून मागणी करू. परंतु तसे झाले नाही.

संभाजीराजे म्हणाले की वारंवार सरकारची भूमिका बदलत आली आहे. परवा 50 टक्के आरक्षणाच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही, असे सांगितले होते. 11 पेक्षा जास्त राज्यात 50 पेक्षा जास्त आरक्षण आहे. आपण दुसऱ्या राज्याचे म्हणणे ऐकून घेऊ. एका अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे, की विशेष बाब म्हणून तुम्ही आरक्षण देऊ शकता, असे म्हटले होते. परंतु विशेष बाब कशी सिद्ध करणार?

गायकवाड अहवालाचे पूर्ण भाषांतर झाले आहे का. जेवढे पाहिजे तेवढे घेतले, म्हणजे हे कोण ठरविणार. मराठा समाजाच्या वतीने आणि मागासवर्गीय आयोग नेमला होता, त्यासाठी दोन वरिष्ठ वकिल देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

102 ची घटना दुरुस्ती 

102 ची घटना दुरुस्तीचा विषय महत्त्वाचा आहे. राज्यसभेत एक समिती नेमलेली आहे. त्यामध्ये 25 खासदार आहेत. त्यात चार महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी अहवालामध्ये 12 नंबरच्या मुद्द्याचा अभ्यास करावा. जे मागासवर्गीय अहवाल तयार केला जातो. त्यातून राज्याचा अधिकार काढून घेतला जाणार नाही. विषय ईकडे-तिकडे नेऊ नका. केंद्र सरकारने एक शपथपत्र द्वावे. सोमवारी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी मिटिंग होणार आहे. सामाजिक मागास कायदा बारीक झाला. तो कोणी केला. आपण गल्लीतल्या भांडणासारखे भांडत बसलो आहोत. माझी मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांना विनंती आहे, की एकमताने जसा कायदा पारित केला, तशीच येणारी सुनावनीच्या वेळी एकत्र राहू. जो काही निकाल लावायचा, तो याच वेळी लावा. मराठा समाजातील मुलांचे मोठे नुकसान होत आहे. सत्तेत असतील, किंवा नसतील त्यांनीही या विषयाला पाठिंबा दिला पाहजे. माझं-तुझं म्हणण्यापेक्षा या प्रकाराचा निकाल लावा, हीच मागणी आहे.
 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com