Minister shambhuraj desai
Minister shambhuraj desai

गृहराज्यमंत्री व्यावसायिकांना म्हणाले, पोलिस तुम्हाला हप्ते मागतात का....

रक्षाबंधन सणाच्या तोंडावर लॉकडाउन शिथिल झाल्याने बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण किती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी बाजारपेठेत फिरत आहे. सध्या महिलांची गर्दी मोठ्याप्रमाणात दिसत आहे. या लॉकडाउनमुळे छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच आर्थिकव्यवहार मंद गतीने चालले आहे.

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातील बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी व किरकोळ व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तुम्हाला पोलिसांचा काही त्रास आहे का, पोलिस तुम्हाला हप्ता मागतात का, असेही त्यांनी व्यावसायिकांना विचारले. त्यावर सर्वांनी नाही, म्हटल्यावर पोलिस समोर आहेत म्हणून नाही सांगू नका. कोणी त्रास देत असेल तर सांगा, असा धीरही त्यांनी दिला. 

गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सायंकाळी सातारा शहरातील मोती चौक ते जुना मोटारस्टॅण्ड चौक असे चालत जाऊन या ठिकाणच्या छोट्या व्यावसायिक व दुकानदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक आण्णासाहेब मांजरे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक विठ्ठल शेलार तसेच स्वीय सहायक निलेश फाळके पोलिस उपस्थित होते. 

चक्क गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बाजारपेठेत पायी फिरत असल्याचे पाहून अनेकांना अश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांच्या मागे गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी वाहने थांबवून ठेवली. त्यावर लगेचच श्री. देसाई यांनी पोलिसांना ट्रॅफिक अडवू नका, ट्रॅफिक सोडा असे सांगितले. यावेळी त्यांनी पेढ्याचे व्यावसायिक, गजरेवाला तसेच राखी विक्रेते, रस्त्याच्या कडेने बसलेले विक्रेते यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. 

यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात एक तारखेपासून लॉकडाउन अंशतहा शिथिल केले आहे. रक्षाबंधन सणाच्या तोंडावर लॉकडाउन शिथिल झाल्याने बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण किती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी बाजारपेठेत फिरत आहे. सध्या महिलांची गर्दी मोठ्याप्रमाणात दिसत आहे. या लॉकडाउनमुळे छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच आर्थिक
व्यवहार मंद गतीने चालले आहे.

तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी लाकउाडन शिथिल केल्याने दुकाने सुरू झाल्याने गर्दी सुरू झाली आहे. हळूहळू अर्थव्यवस्थेचा गाढा रूळावर येत आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही पोलिस व महसूल प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे.
व्यावसाय सुरू झाल्याने उलाढाल वाढणार आहे. पण लोकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. स्वंयशिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com