व्देष माजविणाऱ्या भाजपला वेळीच धडा शिकवा : विलासराव उंडाळकर

नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी केली आणि कोट्यवधींचा निधी सरकारने हडपला, असा घणाघातही उंडाळकर यांनी केला.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बनविलेले कायदे शेतकरी वर्गाला उद्वस्त करणारे आहेत. म्हणून या देशाला काँग्रेस विचारधारेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुलमी सरकारला वेळीच अडविले पाहिजे.
 Teach BJP a lesson in time says Congress Leader Vilasrao Undalkar
Teach BJP a lesson in time says Congress Leader Vilasrao Undalkar

कऱ्हाड (जि. सातारा) : भाजप पक्षाकडून मलाही ऑफर होती. मात्र, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी आम्ही बांधिल होतो. काँग्रेसची विचारधारा सोडून इतर पक्षात जाणं आमच्या बुध्दीला न पटणारं होतं आणि जातीवादी पक्षाशी हात मिळवणी करणं, हे आमच्या विचारात बसत नव्हतं. आज भाजप सरकार देशात व्देष माजवत आहे. शेतकरी वर्गाची गळचेपी करत आहे. या सरकारला वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकरांनी लागावला. 

कऱ्हाड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. उंडाळकर म्हणाले, मला जनतेनं पुष्कळ दिलं आहे, कशाचीच कमी नाही. यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला बेरजेच्या राजकारणाचा संदेश दिला. तोच संदेश आम्ही यशस्वीरित्या पुढे चालवू. माझ्या ५० वर्षातील आयुष्यातील पहिली मीटिंग मी हॉलमध्ये घेत आहे. तरी देखील इतकी गर्दी, ही आमच्या कामची पोहोच आहे.

मला आठवतंय, २००३ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी कऱ्हाडात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्टेडियमवर सभा बोलवली होती. त्या सभेला दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती होती. तेव्हा आम्ही २००४ ची निवडणूक जिंकून दाखवली होती. सध्या देश आर्थिक, सामाजिक व्देषात गुरफटला आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रबोधन हा शब्द देखील माहिती नाही, तो त्यांच्यात रुजवला पाहिजे. 

नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदी केली आणि कोट्यवधींचा निधी सरकारने हडपला, असा घणाघातही उंडाळकर यांनी केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बनविलेले कायदे शेतकरी वर्गाला उद्वस्त करणारे आहेत. म्हणून या देशाला काँग्रेस विचारधारेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुलमी सरकारला वेळीच अडविले पाहिजे.

१९२३ मध्ये दांडी मार्चमध्ये गांधींनी लठ्या काट्या खाल्या व आपला देश गुलामगिरीतून वाचवला. आता तशीच वेळ आली आहे. या भाजप सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालवली आहे. कोणतही मटण आणलं तरी गायीच मटण आहे, म्हणून सामान्यांनी ठोकून काढलं जातं आहे. ही कसली मर्दुमकी, असा प्रश्न करून ते म्हणाले, सध्या डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. 

यशवंतरावांनी शिक्षण, माथाडी कायदा समृध्द केला. पतंगरावांनी शिक्षण मोफत केले. मात्र, लोक यांना विसरत आहेत. काँग्रेस विचारधारा, मूल्य, संस्कृती जपली पाहिजे. १९०६ मध्ये छोडो भारतच्या माध्यमातून भारताबरोबर विश्वाची काळजी केली. गरीबांच्या कल्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करणे गरजेचे आहे. बहुजन समाज म्हणजे मराठा नव्हे, तर तेली, माळी, मराठा आधी सर्व आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कराड तालुका थोरांची क्रमभूमी आहे, ती जपायला हवी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com