फलटण : फलटण शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यावर मालोजी शिदोरी मधून थाळी उपलब्ध करून द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजुंना उपाशी पाठवू नका, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.
सध्या कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. या शिवभोजन थाळीचा चांगला प्रतिसाद मिळत असून यातून गोरगरिबांना लॉकडाऊनमध्ये हातभार मिळाला आहे.
यामध्ये फलटण शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. दररोज मोठ्याप्रमाणात शिवभोजन थाळीला प्रतिसाद मिळत आहे. पण या केंद्राला असलेली थाळींची मर्यादा संपल्यास बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर गोरगरिबांना मोफत अन्न मिळण्यात अडचण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यावर मालोजी शिदोरीमधून थाळी उपलब्ध करून द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजुंना उपाशी पाठवू नका, अशी सूचना केली आहे. याबाबतची माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.