वाळू उपशावरून माण तालुक्यात दोन गटात धुमश्चक्री; नरवणेतील दोघांचा मृत्यू
दहिवडी : पंचनामा झालेल्या वाळूचा लिलाव घेतल्यानंतर बेकायदेशीर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी झाल्याने माण तालुक्यातील नरवणे येथे बुधवारी दोन गटात धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन्ही गटांतील दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे. नरवणे गावात तणावपूर्ण वातावरण असून गाव बंद ठेवण्यात आले आहे.
चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडीबा जाधव अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नरवणे येथील जप्त केलेल्या वाळूचा १२ मार्चला पंचनामा झाला होता. पंचनामा झालेल्या वाळूचा लिलाव चंद्रकांत जाधव यांनी घेतला होता. परंतू तेथून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची तक्रार गावकामगार तलाठी यांच्याकडे करण्यात आली होती.
यावरून आज सकाळी गावातील दोन गटात धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन्ही बाजूकडून शस्त्रांचा वापर करून एकमेकांवर हल्ला झाला. तलवारीने झालेल्या हल्ल्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे.
सातारा सातारा सातारा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.