तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल : उदयनराजे

राज्यसभेच्या या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करणार आहे. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहिन, अशी भावना त्यांनी व्यक्तकेली.
MP Udyanraje Bhosale
MP Udyanraje Bhosale

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. लोकांना घरात बसून रहा, असे फार काळ सांगता येणार नाही. असे वारंवार सांगितले तर, उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भिती भाजपचे खासदार  उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

दिल्लीत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

 उदयनराजे म्हणाले, कोरोनाचा कठीण काळ असला तरी घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रस्थानी ठेवूनच काम करत आलो आहे. पद नसताना समाजकारण केले. राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात समाजाची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली.

राज्यसभेच्या या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करणार आहे. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहिन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाविषयी बोलताना ते म्हणाले, कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.

लोकांना घरात बसून रहा, असे फार काळ सांगता येणार नाही. असे वारंवार सांगितले तर, उद्या कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन हा प्रश्‍न ऐरणीवर येईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com