मराठवाड्याच्या पाण्याचा विषय नसल्यामुळे विलासरावांनी फाईलच भिरकावून दिली.. 

भाळवणीचे निंबाळकर हे त्यांचे आजोळ असल्याने विलासराव देशमुख यांचे बालपणापासून नंतरही आष्टी तालुक्यात अनेक शासकीय आणि खासगी दौरे झाले. त्यामुळे या तालुक्याच्या मातीशी त्यांची नाळ अधिकच घट्ट होती. मी विलासराव देशमुख यांना कधीही भेटलो कि ‘काय चाललंय मामाच्या गावचे आमदार’ असे मला म्हणायचे.
Vilasrao Deshmukh & Suresh Dhas  news beed
Vilasrao Deshmukh & Suresh Dhas news beed

बीड : २००६ मध्ये औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विकासासाठी दोन दिवसांची मंत्रीमंडळ बैठक औरंगाबादला झाली. त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत मरावाड्याच्या हक्काच्या पाण्याचा विषय आलाच नाही. अंतिम मान्यतेसाठी आलेल्या फाईलमध्ये मरावाड्याच्या हक्काच्या २१ टिएमसी पाण्याचा विषय नसल्याने विलासराव देशमुख यांनी अक्षरश: फाईल भिरकावून दिली होती.

भाळवणी (ता. आष्टी) हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे आजोळ. निंबाळकरांच्या या आजोबा - मामांच्या घरी ते अनेकदा राहीले. त्यामुळे त्यांना आष्टी तालुक्याचा जिव्हाळा होताच. पण, मराठवाड्याच्या विकासासाठी आणि मराठवाड्याच्या माणसांवर विलासराव देशमुख यांनी पक्षविरहीत प्रेम केले. मराठवाड्याच्या विकासाची खरी तळमळ त्यांच्यात होती.  

मी भाजपचा आष्टाची आमदार होतो त्यावेळचा तो प्रसंग मला आजही आठवतो. आष्टी तालुका हा विलासराव देशमुख यांच्या आजोळाचा तालुका. भाळवणीचे निंबाळकर हे त्यांचे आजोळ असल्याने विलासराव देशमुख यांचे बालपणापासून नंतरही आष्टी तालुक्यात अनेक शासकीय आणि खासगी दौरे झाले. त्यामुळे या तालुक्याच्या मातीशी त्यांची नाळ अधिकच घट्ट होती. मी विलासराव देशमुख यांना कधीही भेटलो कि ‘काय चाललंय मामाच्या गावचे आमदार’ असे मला म्हणायचे.

मरवाड्याच्या माणसावर आणि मरावाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर विलासराव देशमखु यांचे पक्षविरहीत प्रेम होते. त्यांनीच मरवाठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबादला दोन दिवसांची मंत्रीमंडळ बैठक घेतली. २००६ साली झालेल्या बैठकीच्या आदल्या दिवशी त्यांनी मरावाड्यातील सर्व आमदारांना सुभेदारी विश्रामगृहावर बोलावून घेतले. मराठवाड्याच्या हक्काचे २१ टिएमसी पाणी मिळावे ही मागणी मी आग्रहाने लाऊन धरली.

कारण, मराठवाड्याच्या हक्काच्या या पाण्यात केवळ उस्मानाबाद व बीड या दोन जिल्ह्याला फायदा होता. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आष्टी व पाटोदा या माझ्या मतदार संघाला त्याचा फायदा होणार असल्याने मी आग्रही होतो. दोन दिवसीय मंत्रीमंडळ बैठक सुरु झाली, दुसऱ्या दिवशी मराठवाड्याच्या विकासाची घोषणा व पॅकेज जाहीर करण्याच्या फाईलमध्ये मरावाड्याच्या हक्काच्या पाण्याचा विषय फाईलमध्ये आलाच नाही. फाईल पाहून विलासराव देशमुख यांनी फाईल अक्षरश: भिरकावून दिली होती, तो प्रसंग मला आजही आठवतो.

असेच एकदा अंबा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत दिवंगत आडसकर यांचे लोकनियुक्त पॅनल विजयी झाले. दिवंगत मेघराज आडसकर अध्यक्ष झाले. पण, स्थानिक पातळीवर तत्कालिन मंत्री दिवंगत डॉ. विमलताई मुंदडा व दिवंगत बाबूराव आडसकर यांच्यातील राजकारणातून हा कारखाना अवसायनात काढला.  तेव्हा मी, मेघराज आडसकर अजित पवार यांना भेटलो. त्यांच्यासह विलासराव देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर हकीकत सांगीतली आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांच्या अपरोक्ष त्यांनी तत्काळ फाईलवर स्वाक्षरी करुन हाती सोपवली होती.

(शब्दांकनः दत्ता देशमुख)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com