पीक विमा सगळ्यांना मिळावा हीच भूमिका; मुख्यमंत्र्यांशी बोलणार.

पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन मंडळात विमा कंपन्यांनी फळबाग विमा मंजुर केला आणि इतरांना नाकारला हे चुकीचे आहे. तालुक्यातील सगळ्याच मंडळातील शेतकऱ्यांना तो मिळाला पाहिजे अशीच माझी देखील इच्छा आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या या संदर्भात माझे बोलणे झाले आहे, त्यांनी देखील यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे.
sadipan bhumre news paithan
sadipan bhumre news paithan

औरंगाबादः पैठण तालुक्यातील दहा पैकी तीन मंडळातील शेतकऱ्यांनाच फळपीक विमा मंजुर झाला, हे खरे आहे. पण सगळ्यांनाच पीक विमा मिळाला पाहिज अशीच माझी देखील भूमिका, या संदर्भात यापुर्वीच मी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यांशी देखील या विषयावर बोलून ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा सगळ्याच शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.

पैठण या मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनाच पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजुर होत नसेल तर मग दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संदीपान भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भुमरे म्हणाले, तालुक्यातील दहा पैकी तीन मंडळातील शेतकऱ्यांनाच विमा कंपन्यांनी फळपीक विमा मंजुर केला हे खरे आहे. या संदर्भात मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन संपुर्ण माहिती देखील घेतली आहे. अनेक भागात पाऊसच झाला नव्हता, त्यामुळे एका गावांतील शेतकऱ्यांना विमा मंजुर होतो, आणि त्याला लागून असलेल्या दुसऱ्या गावात तो नाकारला जातो हे चुकीचे आहे.

पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन मंडळात विमा कंपन्यांनी फळबाग विमा मंजुर केला आणि इतरांना नाकारला हे चुकीचे आहे. तालुक्यातील सगळ्याच मंडळातील शेतकऱ्यांना तो मिळाला पाहिजे अशीच माझी देखील इच्छा आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या या संदर्भात माझे बोलणे झाले आहे, त्यांनी देखील यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. सध्या राज्यावर आणि देशावर कोरोनाचे संकट आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. फळपीक विम्याच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळू शकतो. लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मी या संदर्भात विनंती करणार आहे. फळपीक विम्याचा प्रश्न लवकरच सुटेल, आणि नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना विमा मिळेल, असा विश्वास देखील भुमरे यांनी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com