तुम्ही ज्यांना जबाबदारी दिली ते अपयशी, पवार साहेब, अजितदादा, बीडकडे लक्ष द्या..

आपण राजकारणापेक्षा कधीही जनतेच्या हिताला प्राध्यान्य दिले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली.
Bjp Leader Pankaja Munde Apeal sharad Pawar, Ajit Pawar News Aurangabad
Bjp Leader Pankaja Munde Apeal sharad Pawar, Ajit Pawar News Aurangabad

औरंगाबाद ः शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यांच्यावर बीड जिल्ह्याची जबादारी दिली आहे, ते अपयशी ठरले आहेत, त्यांना लोकांच्या जीवापेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना पाया पडून देखील रेमडिसिव्हर इंजेक्शन, आॅक्सीजन मिळत नाहीये. माझी शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्र्याकडेही हात जोडून विनंती आहे, की माझ्या बीड जिल्ह्यातील लोकांची होणारी हेळसांड थांबवा, असे आवाहन करत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा  आपले बंधू व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या एकाच रुग्णवाहिकेत तब्बल २२ कोरोना मृतांचे मृतदेह कोंबल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून जारी केला आहे. अंबाजोगाईतील या प्रकाराबद्दल संताप आणि मृतांबद्दल दुःख व्यक्त करतांनाच त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार टीका केली.

पकंजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना एका इंजेक्शनसाठी प्रशासनातील लोकांच्या पाया पडावे लागत आहे. मेडिकलचालक, डाॅक्टरांकडून नोंदणी करून देखील रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले जात नाहीयेत, कारण त्यांना आदेश नाहीत. डाॅक्टरांना बोलण्याचा अधिकार नाही, जिल्हा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. बीड जिल्ह्यातील लोकांची अशी हेळसांड याआधी कधीच झाली नव्हती.

परळीतील एका डाॅक्टला देखील रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन मिळाले नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला. एकीकडे हे सगळं सुरू असतांना जिल्ह्यातील सत्ताधारी मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहेत. अजित पवार यांनी रेमडिसिव्हर इंजेक्शन कुणाच्या खिशातून जाता कामा नये असे म्हटले होते, पण इथे नोंदणी करून देखील ते रुग्णांना दिले जात नाही. कुणी बोलायला तयार नाही, चौकशी केली तर ती कशी दडपायची याचा अनुभव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलाच आहे.

तेव्हा माझी शरदचंद्र पवार साहेब, अजितदादा व मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. तुम्ही ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, ते अपयशी ठरले असून कोरोनासारख्या महामारीत देखील ते राजकारण करत आहेत, असा आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केला. आपण राजकारणापेक्षा कधीही जनतेच्या हिताला प्राध्यान्य दिले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली, त्यामुळे माझे राजकीय नुकसान देखील झाले, पण आपण भूमिकेशी तडजोड केली नाही? असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com