खाजगी हाॅस्पीटलची लाॅबी कोरोना रुग्णांना योजनेचा लाभ मिळू देत नाही...

राज्य सरकारने जी ६५ हजार रुपयांची मर्यादा घालून दिली आहे, किमान तेवढा तरी लाभ रुग्णांना मिळावा अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. प्रत्यक्षात फक्त दोनशे रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती आहे. इतर रुग्णांकडून दोन-अडीच लाखांची बीले खाजगी रुग्णालयांकडून वसुल केली जात आहे. जी लाॅबी किंवा खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ रुग्णांना मिळू देत नाही, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा.
mp imtiaz jalil news aurangabad for corona
mp imtiaz jalil news aurangabad for corona

औरंगाबाद ः खाजगी रुग्णालयांमध्ये उपाचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जीनवदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करतोय. पण खाजगी हाॅस्पीटलमधील लाॅबीच त्यांना या योजनेचा लाभ मिळू देत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत आज पुन्हा खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांची होणारी लूट, त्यांना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेचा न मिळणारा लाभ या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. 

यासंदर्भात माहिती देतांना इम्तियाज जलील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगून देखील औरंगाबाद जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. यावर बैठकीत अशी माहिती मिळाली की खाजगी रुग्णालये ही योजना कशी टाळती येईल यासाठीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे.

राज्य सरकारने जी ६५ हजार रुपयांची मर्यादा घालून दिली आहे, किमान तेवढा तरी लाभ रुग्णांना मिळावा अशी आमची मागणी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. प्रत्यक्षात फक्त दोनशे रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती आहे.

इतर रुग्णांकडून दोन-अडीच लाखांची बीले खाजगी रुग्णालयांकडून वसुल केली जात आहे. जी लाॅबी किंवा खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ रुग्णांना मिळू देत नाही, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा,  अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी बैठकीत केली.

सौम्य लक्षणे असणारे आता होम क्वारटाइन..

या शिवाय एखाद्या घरात कोरोनाचा पाॅझीटीव्ह रुग्ण आढळला, तर त्या घरातील सर्वच सदस्यांना कुठलीही लक्षणे नसतांना सरसकट विलगीकरण कक्षात ठेवणे योग्य नसल्याचे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले होते. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर आता ज्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळतील अशा नागरिकांना होम क्वारंटाइन करण्याचा महत्वपुर्ण निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला.

जिल्ह्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२ टक्के असून मृत्यू दर देखील कमी झाला असल्याचा दावा प्रशासनाने केला. एकाच घरात सौम्य लक्षणे असणाऱ्या  व स्वतंत्र विलगीकरण करता येईल एवढी पुरेशी जागा असेल तर् अशा रुग्णांना आता त्यांच्या घरीच क्वारंटाइन करता  येणार आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com