महाविकास आघाडीचा घोळ संपू द्या, मग आम्ही ठरवू...

विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे. एमआयमकडे दोन मते असली तरी आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही. महाविकास आघाडीतील घोळ संपण्याची आम्ही वाट पाहत आहोत. उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार कायम ठेवतो, की मग रिंगणातून माघार घेतो, हे स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही आमचे पत्ते उघड करू.
imtiaz jalil news for mlc election
imtiaz jalil news for mlc election

औरंगाबादः विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नाना आघाडीतीलच कॉग्रेस पक्षाने वेगळी भूमिका घेत खीळ लावली आहे. संख्याबळानूसार एक उमेदवार निवडूण येत असतांना एमआयएम, मनसे आणि काही तटस्थ पक्षांचा पाठिंबा मिळवून दुसरा उमेदवार देखील निवडूण आणण्याचा कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. या संदर्भात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. महाविकाआघाडीचा घोळ आधी संपू, द्या मग आम्ही काय करायचे ते ठरवू, असा सूचक इशारा त्यांनी सरकारनामाशी बोलतांना दिला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार होण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाल्यानंतर आता कॉंग्रेसने महाविकास आघाडीच्या आणि मुख्यमंत्र्याच्या अडचणीत भर टाकली आहे. महाविकास आघाडीच्या संख्याबळानूसार पाच उमेदवार निवडूण येत असतांना कॉंग्रेसने दोन उमेदवार देत ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्गात खोडा घातल्याचे बोलले जाते.

कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामळे आज दिवसभर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते. कॉंग्रेसेने माघार घेण्याऐवजी महाविकास आघाडीने सहा उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन कॉंग्रेसकडून केले जात आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी मतदान होणार की बिनविरोध निवड केली जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे. एमआयमकडे दोन मते असली तरी आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही. महाविकास आघाडीतील घोळ संपण्याची आम्ही वाट पाहत आहोत. उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार कायम ठेवतो, की मग रिंगणातून माघार घेतो, हे स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही आमचे पत्ते उघड करू.

एमआयएमच्या आमदारांनी मतदाना झालेच तर काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय अर्थात आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हेच घेतील. तुर्तास आम्ही महाविकास आघाडीतील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. चित्र स्पष्ट झाल्यानंतर सर्व आढावा ओवेसी यांना देण्यात येईल, आणि त्यानंतर ते जो निर्णय घेतील, त्याची माहिती आमदारांना देण्यात येईल, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com