कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कंपनीसमोर माजी आमदाराचे आंदोलन

बजाज कंपनीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील अनेक कलमांचे व नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकीरी व संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अन्यथा आपण हायकोर्टात अपील दाखल करू, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
ex mla harshvardhan jadhav protest against bajaj news
ex mla harshvardhan jadhav protest against bajaj news

औरंगाबाद : कम्युनिटी ट्रान्समिशन होऊन वाळूज येथील बजाज कंपनीतील कामगारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचा आरोप करत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कंपनीसमोर आंदोलन सुरू केले आहे. शहरात कोरोनाचा जो स्फोट झाला आहे, त्याला अशा कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप करतांनाच बजाज कंपनीतील पाच कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचा दावा देखील जाधव यांनी केला आहे. 

हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच बजाज कंपनीला प्रशासन पाठीशी घालत असलल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. तसेच वाळूज येथील कंपनीत १४० कोरोना पॉझीटीव्ह पेशंट आढळल्याचा दावा केला होता. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानूसार ज्या कंपनीत दोन पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळतील ती कंपनी तात्काळ ४८ तासांसाठी बंद करावी, पूर्णपणे सॅनिटाईज करावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

परंतु बजाज कंपनीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाही, रुग्ण आढळत असतांना कंपनी सुरू असल्याने तो कामगारांच्या जीवाशी खेळ ठरत असून कंपनी बंद करावी अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करत, जर कंपनी बंद केली नाही, तर आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा जाधव यांनी दिला होता. आज दुपारी हर्षवर्धन जाधव यांनी थेट बजाज कंपनी गाठत, मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले.

यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलतांना, हर्षवर्धन जाधव यांनी शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप केला. आतापर्यंत कंपनीत ५ कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर तीनशेवर कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा करतांनाच  त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील हा विषय गांभीर्याने घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कंपनी बंद करण्या संदर्भात मागणी करावी, असे आवाहन देखील जाधव यांनी केले. बजाज कंपनीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील अनेक कलमांचे व नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधाकिरी व संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अन्यथा आपण हायकोर्टात अपील दाखल करू, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com