देशाची अंतर्गत सुरक्षा सीआरपीएफशिवाय अशक्य; अमित शहांचे गौरवोद्दगार..

आरपीएफच्या प्रत्येक जवानांनी वृक्षाशी आपली नाळ जोडावी. वृक्ष लागवडीसोबत त्या वृक्षाचे संगोपन आपल्या मुलांप्रमाणे करावे.
Central Home Minister Amit Saha In Nanded News
Central Home Minister Amit Saha In Nanded News

मुदखेड (जि. नांदेड) ः केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांवरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय देशाची सुरक्षा अशक्य आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी व्यक्त केले. (The country's internal security is impossible without the CRPF; Glorious Amit Shah)  मुदखेड येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये पिंपळाच्या रोपाची लागवड करून एक कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा शुक्रवारी शहा यांनी पुर्ण केला.  यावेळी त्यांनी जवानांसोबत देखील संवाद साधला.

व्यासपीठावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, सीआरपीएफचे महानिदेशक कुलदिपसिंह, जुल्फिकार हसन, रश्मी शुक्ला, एम. एस. भाटिया आदी उपस्थित होते. (Central Home Minister Amit Saha) यावेळी अमित शहा म्हणाले, देशातंर्गत असलेल्या महत्त्वाच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ मोठी जोखीम उचलत आहे. देशांतर्गत सुरक्षा ही सीआरपीएफ जवानांशिवाय होऊ शकत नाही.

या देशांमध्ये पर्यावरणचे संगोपन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी सीआरपीएफ जवानांकडून देशातील प्रत्येक सीआरपीएफच्या केंद्रांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. (Mp Prataprao Patil Chikhlikar, Nanded) हा संकल्प सीआरपीएफने माझ्या हाताने मुदखेड येथील केंद्रामध्ये पिंपळ या वृक्षाची लागवड करून केला आहे. पिंपळ, कडुलिंब व तुळस हे वृक्ष ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात देतात, शिवाय या वृक्षांना आयुष्यमान जास्त असल्यामुळे सृष्टीचे संरक्षण देखील चांगल्या प्रकारे होत असते.

त्यामुळे हे वृक्ष मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच निजामशाहीतून मराठवाडा व तेलंगणा हे दोन विभाग आज मुक्त झाले, त्यांना स्वातंत्र्य मिळाले तो हा दिवस आहे. हा दुग्धशर्करा योग असून या दिनानिमित्त मला छत्रपती शिवाजी महाराज व श्री गुरुगोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये येता आले हे माझे भाग्य आहे. 

 वृक्षांशी नाळ जोडा..

विकास करत असताना पर्यावरणाची हानी होवू नये तसेच पर्यावरणाचे संगोपन व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृक्ष लागवडीची संकल्पना आणली. तिला प्रत्यक्षात उतरवले आहे. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा उद्भवणारा मोठा धोका वृक्ष लागवड आणि संगोपनातून टाळला जाऊ शकतो. सीआरपीएफच्या प्रत्येक जवानांनी वृक्षाशी आपली नाळ जोडावी. वृक्ष लागवडीसोबत त्या वृक्षाचे संगोपन आपल्या मुलांप्रमाणे करावे, असे आवाहनही अमित शहा यांनी यावेळी केले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com