औरंगाबादेत कोरोनाचे पाच बळी, मृतांचा आकडा ५५ वर..

नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली असतांनाच उपाचरानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आज शहराच्या विविध भागातील ११ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले.
five corona paicent dead in aurangabad news
five corona paicent dead in aurangabad news

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट आलेली असतांनाच गेल्या नऊ तासात घाटी रुग्णालयात उपाचर घेत असलेले पाच कोरोनाचे रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोडमधील एकाचा समावेश आहे. तर आज अकरा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर हिंगोली जिल्ह्यात मुंबई, पुणे व इतर शहरातून आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, गेल्या तीन दिवसांतील प्रमाण पाहता ही संख्या निम्म्यावर आल्याचे दिसते. एकीकडे ही समाधानाची बाब असतांनाच आज पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा औरंगाबादकारांची धाकधुक वाढली. नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली असतांनाच उपाचरानंतर बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आज शहराच्या विविध भागातील ११ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले.

यामध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे. तर आज मरण पावलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा २४ मे रोजी आणि गारखेडा येथील ४८ वर्षीय रुग्णाचा २४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर आज मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील ७५ वर्षीय महिलेचा पहाटे सव्वा तीन वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा पहाटे साडे सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमधे चार महिला व एका पुरूषचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या ५५ झाली आहे.

या शिवाय मराठवाड्यातील कोरोना रुग्णांमध्ये आज हिंगोली जिल्ह्यातील ८ नव्या  रुग्णांची भर पडली आहे. कळमनुरी तालुक्यातील ८ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून मुंबई, पुणे व रायगड येथून हिंगोलीत आलेले हे सर्व रुग्ण असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकुण संख्याल आता १६९ झाली झाली आहे. त्यापैकी ९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com