मुख्यमंत्र्यांचे काम उत्तम, ते कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत..

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच बसून परिस्थिताचा आढावा घेत आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावे, असे आमचे ठरले आहे. कोरोनाच्या संकट काळात उद्धव ठाकरे हे सकाळपासून रात्री उशीरापर्यंत राज्यातील संपुर्ण परिस्थीचा आढावा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेकडून घेत असतात. यातून ज्या त्रुटी किंवा कमतरता जाणवतात त्यावर निर्णय घेऊन तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊन ते सोडवण्याचे काम ते मुंबईत बसून करत आहेत.
cm udhav thackerays work is exllent news
cm udhav thackerays work is exllent news

औरंगाबाद ः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ते राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील आढावा प्रशासकीय यंत्रणेकडून घेण्याच्या कामात व्यस्त असतात. यातून ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याची पुर्तात करत कोरोनाच्या या संकटावर ते अखंडपणे काम करत असल्याचे स्पष्ट करतांनाच त्यांचे काम उत्तम असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकरांशी बोलतांना शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शरद पवार म्हणाले, राज्य आणि देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटाला आपण एकत्रितपणे सामोरे गेलो, तर त्यावर निश्चितच मात करू शकतो. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी करणे हे आपले उदिष्ट आहे. लोकांचा सहभाग आणि सहकार्य मिळाले तर हे निश्चितच शक्य आहे.

आॅगस्ट महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असे तज्ञांचे मत आहे, जर असे झाले तर आपल्या अधिक बेडची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने त्याची तयारी करून ठेवावी, जेणेकरून कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. तुम्ही वयाच्या ८० व्या वर्षी देखील राज्यभरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फिरत आहात, मुख्यमंत्री मात्र मुंबईत बसून असल्याची टिका विरोधकांकडून केली जाते, या प्रश्नावर पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे काम उत्तम सुरू आहे असे सांगत विरोधकांच्या टिका खोडून काढली.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच बसून परिस्थिताचा आढावा घेत आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावे, असे आमचे ठरले आहे. कोरोनाच्या संकट काळात उद्धव ठाकरे हे सकाळपासून  रात्री उशीरापर्यंत राज्यातील संपुर्ण परिस्थीचा आढावा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेकडून घेत असतात. यातून ज्या त्रुटी किंवा कमतरता जाणवतात त्यावर निर्णय घेऊन तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊन ते  सोडवण्याचे काम ते मुंबईत बसून करत आहेत. 

संकटात धावून जायला आवडते..

मी लोकांमध्ये रमणारा माणूस आहे. राज्य व देशावर जेव्हा संकट येते तेव्हा मला बसवले जात नाही. संकटाच्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी फिरत असतो. आजचा दौरा हा कोरोनाच्या संकटात केंद्राशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते जाणून घेण्यासाठीचा आणि ते दिल्लीत मांडण्यासाठीचा आहे. आजच्या आढावा बैठकीतून जे प्रश्न समोर आले आणि ज्याचा संबंध केंद्राशी आहे ते मी, डाॅ. कराड आणि इम्तियाज जलील तीनही खासदार मिळून केंद्रासमोर सांगू. असेही शरद पवार यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक समाजाने सहकार्य केले..

कोरोनाच्या संकटात लोकांनी सण, उत्सव घरातच साजरे करत राज्य सरकारच्या सूचना व नियमांचे पालन केले. मायनाॅरिटी समाजाने तर या संदर्भात एक आदर्शच  निर्माण केला. रमजान ईद त्यांनी घरातच साजरी केली, अगदी नमाज देखील घरातच अदा केली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी यामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडल्याचे गौरवोद्दगार देखील शरद पवार यांनी यावेळी काढले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com