औरंगाबादकरांनो आता खान-पान घरीच, रेस्टाॅरंट, बार बंद फक्त पार्सल मिळणार..

शहरातील अनेक रेस्टाॅरंट, बार, नाश्ता सेंटरवर अचानक जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की तिथे लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही.
Aurangabad Corona Partial lock down Updates News
Aurangabad Corona Partial lock down Updates News

औरंगाबाद ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण संख्या व मृतांचे प्रमाण पाहता जिल्हा प्रशासनाने काही नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी लग्न समारंभावर बंदी घातल्यानंतर आता रेस्टाॅंरट बार सुद्धा येत्या १७ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांना हाॅटेल, बारमध्ये बसून खाता-पिता येणार नसले तरी त्यांना आॅनलाईन किंवा पार्सल घेऊन जाण्याची मुभा असणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आढळून आला होता. आता दुसऱ्या लाटेत देखील औरंगाबाद शहर कोरोना रुग्णांची संख्या व मृतांच्या प्रमाणात आघाडीवर आहे. ११ मार्च पासून जिल्हा प्रशासनाने अशंतः लाॅकडाऊनची घोषणा केली, तसेच शनिवार, रविवार पुर्णबंद पाळण्यात आला. परंतु तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्यात काही फरक पडलेला नाही. पाचशे ते हजार रुग्ण दररोज नव्याने आढळत असल्याने प्रशासन हादरून गेले आहे.

मास्क, कोरोना चाचणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असली तरी सध्या करण्यात आलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे प्रशासनाचे मत बनले आहे. गर्दी होते त्या ठिकाणाहून कोरोनाचा फैलाव होतो, यावर एकमत झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने येत्या १७ मार्च पासून जिल्ह्यातील सर्व हाॅटेल्स, ढाबे, परमिट रुम अल्पोपहार गृह बंद ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी व प्रशानाच्या पथकाने अशंतः लाॅकडाऊन दरम्यान, शहरातील अनेक रेस्टाॅरंट, बार, नाश्ता सेंटरवर अचानक जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की तिथे लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. खातांना-पितांना मास्क घालणे शक्य नसले तरी सामाजिक अंतर किंवा योग्य काळजी देखील घेतली जात नाही. त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य, महापालिका व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेतले.

यात रेस्टाॅरंट, बार, ढाबे, नाश्ता सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी बसून कुणालाही खाता येणार नाही, फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने आज हा घेतलेला निर्णय म्हणजे भविष्यात यापेक्षा अधिक कठोर निर्णय घेण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com