कोल्हापूर : राज्य सरकारच्या कामगिरीवर मी समाधानी नाही, पण सद्यस्थितीत सरकारला कुठलाही धोका नाही, त्यामुळे सरकार पडण्याचे भाजपाचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज लगावला.
मायक्रो फाननान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची होत असलेल्या फसवणुकीबाबत श्री. शेट्टी यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन अशा कंपन्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. शेट्टी यांनी सरकारबरोबरच भाजपावरही टीका केली.
श्री. शेट्टी म्हणाले,"भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील वारंवार सरकार पडणार आहे असे म्हणत आहेत. पण भाजपा अजून स्वप्नातच आहे आणि स्वप्नातच राहील. त्यांचे खरे रूप जनतेला कळाले आहे.' लिंग भेदाबाबत इंदुरीकर महाराज यांची भुमिका चुकीची असल्याचेही श्री. शेट्टी यावेळी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.