25 रुपये दरही शेतकऱ्यांना परवडत नाही : राजू शेट्टी 

25 रुपये दरही शेतकऱ्यांना परवडत नाही : राजू शेट्टी 

वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) : राज्य शासनाने 21 जुलैपासून दुधाच्या दरात वाढ करून लिटरला 25 रुपये दर जाहीर केला आहे. हा दर न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थीदिवशी पुन्हा रस्त्यावर येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

आंदोलनातून शेतकऱ्यांना दूध दर वाढवून मिळाल्याबद्दल खासदार शेट्टी यांचा वाठार स्टेशन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राजू शेळके, ऍड. योगेश पांडे, प्रमोद चव्हाण, बाळासाहेब देशमुख, बापूसाहेब कारंडे, नितीन यादव, जीवन शिर्के, श्रीकांत लावंड उपस्थित होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, "आज दुधाला मिळत असलेला 25 रुपये दरही शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र, महाराष्ट्रात दररोज 20 ते 22 लाख लिटर दुधाचे गरजेपेक्षा जास्त उत्पन्न आहे. कर्नाटक सरकार तेथील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देते. त्याचप्रमाणे राज्य शासनाने येथील शेतकऱ्यांना थेट अनुदान दिल्यास येथील शेतकरी बाहेरून येणाऱ्या दूध उत्पादकांशी स्पर्धा करू शकेल.'' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com