'वंचित-बहुजन' फॅक्टरने घेतली राजू शेट्टींची विकेट

शिवसेना आणि वंचित आघाडीचा 'बहुजन फॅक्टर' शेट्टींना टॅकल करता आला नाही, परिणामी त्यांचा पराभव झाला असे सकृतदर्शनी दिसते.
'वंचित-बहुजन' फॅक्टरने घेतली राजू शेट्टींची विकेट

पुणे: देशपातळीवर शेतकरी नेते म्हणून स्थान निर्माण केलेले खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारक पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांचा 96 हजार मतांनी पराभव केला.

या मतदारसंघात टोकाचा जातीयवादी प्रचार झाला होता. त्याचा निकाल आज आला आहे. राजू शेट्टी भाजपला सोडून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बरोबर गेले, म्हणून त्यांचा पराभव झाला असे चंद्रकांतदादा सांगत आहेत. मात्र खरे कारण जातीय समीकरणांतच आहे. राजू शेट्टींचे कट्टर विरोधक आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे हातकणंगल्यात बहुजन समाजाचा खासदार झाला पाहिजे, असे जाहीरपणे सांगत होते. तोच प्रचार उमेदवार धैर्यशील मानेंचा होता. यापाठीमागे राजू शेट्टींचा समाज आणि धैर्यशील मानेंच्या समाजात ध्रुवीकरण अपेक्षित होते आणि ते तसेच घडले. 

हातकणंगल्यातील बहुजन खासदाराचे संदर्भ वेगळे होते. त्यामुळे शेट्टी घेरले गेले. या फॅक्टरमध्ये त्यांची विकेट गेली. शिवसेना भाजपच्या प्रचारामुळे शेट्टींचा शेतकरी मतदार विभागला. दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीमुळे वंचित बहुजन समाज शेट्टींपासून दुरावला. शेट्टी 96 हजार मतांनी पराभूत झालेत. तर वंचित आघाडीचे अस्लम सय्यद यांना 1 लाख 37 हजार मते मिळाली आहेत. शेट्टींना विजयासाठी आवश्यक मतापेक्षा 40 हजार मते वंचितला अधिक मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com