मंत्र्यांचे राज्यात दुष्काळी पर्यटन : राजू शेट्टी

राज्यात तीव्र दुष्काळ आहे. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. त्यातच टॅंकर माफियांनी हैदोस घातला आहे. सरकार मात्र अजूनही बघ्याच्याच भूमिकेत आहे. मंत्र्यांचे दौरे केवळ दुष्काळी पर्यटन ठरले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्‌टी यांनी आज येथे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
मंत्र्यांचे राज्यात दुष्काळी पर्यटन : राजू शेट्टी

नागपूर : राज्यात तीव्र दुष्काळ आहे. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. त्यातच टॅंकर माफियांनी हैदोस घातला आहे. सरकार मात्र अजूनही बघ्याच्याच भूमिकेत आहे. मंत्र्यांचे दौरे केवळ दुष्काळी पर्यटन ठरले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्‌टी यांनी आज येथे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील दृष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी आजपासून विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधून दौऱ्यामागील भूमिका विशद केली. चारा छावण्यांमध्येही पाणी, चारा नसून जनावरांची आबाळ सुरू आहे. आचारसंहितेचे कारण देत सरकारने वेळकाढू धोरण स्वीकारले. त्यानंतरही विजयाच्या जल्लोषात शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. अद्यापही दुष्काळ निवारणाची कामे कुठेही हाती घेण्यात आली नाहीत. शेतकरी अडचणीत असतील त्या प्रत्येक ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

प्रश्‍न विचारणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध 353 कलम लावून कारागृहात डांबले जात आहे. पण, आता कितीही दडपशाही करा, आम्ही
आंदोलन करणारच, या शब्दात त्यांनी शासनकर्त्यांना आव्हान दिले. दौऱ्यावर यायला उशीर झाला खरा, पण दु:खात असूनही आपण बाहेर पडलो असल्याचे ते म्हणाले.

साखर कारखाने अडचणीत आहेत. साखरेवर कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असूनही बॅंका ऐकायलासुद्धा तयार नाहीत. शासनाने साखरेचा बंपर स्टॉक करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेचे निकाल संशयास्पद आहेत. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला केंद्राजवळ वायफायचे सिग्नल दिसत होते. तक्रार करताच ते गायब झाले. 250 हून अधिक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात मोठी तफावत आहे. मतमोजणीत प्रारंभी विरोधक आघाडीवर असतात नंतर मात्र मागे पडतात. मागे पडण्याचे प्रमाणही सारखेच आहे. यामुळेच ईव्हीएमवर मतदान घेणे ही लोकशाहीची थट्टा असल्याची कुजबूज सुरू झाली असून ही अराजकतेकडे नेणारी
स्थिती असल्याचे मत शेट्टी यांनी नोंदवले.

जातीय तेढ निर्माण करून निवडणुकांना सामोरे जाणे हे भाजपचे षड्‌यंत्र आहे. त्यांच्या विरोधात अहंकार बाजूला ठेवून वंचित आघाडीसह सर्वांनीच एकत्र यावे. व्यापक आघाडी व्हावी यासाठी पूर्वीही प्रयत्न केले. ते आताही सुरू आहेत. विधानसभा
निवडणुकीसंदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com