अमित शहांची करंगळी धरून कोल्हापुरात या मग, दाखवितो ब्रेकींग न्यूज काय असते ती ! शेट्टींचे सदाभाऊंना आव्हान

अमित शहांची करंगळी धरून कोल्हापुरात या मग, दाखवितो ब्रेकींग न्यूज काय असते ती ! शेट्टींचे सदाभाऊंना आव्हान

पुणे :  भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची करगंळी धरून मंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात येऊन दाखवावे, मग त्यांना दाखवितो ब्रेकींग न्यूज काय असते ती ? असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात दिले. 

शेट्टी यांनी पुण्यातील साखर संकुलात येऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआपी प्रमाणे दर मिळवून देण्याची मागणी केली. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन सत्तर दिवस झाल्यानंतर देखील राज्यातील एकही कारखाना एफआपी प्रमाणे दर देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. साखर आयुक्तांनी आम्हाला एफ आरपीप्रमाणे दर मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही ते म्हणाले. 

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खोत यांनी शेट्टींवर टीका करताना म्हटले होते की, शेट्टींची आंदोलने ब्रेकींग न्यूजसाठी असतात. सदाभाऊंचा समाजार घेताना ते म्हणाले, "" अमित शहांचा कोल्हापुरचा दौरा सुरळीत करायचा असेल तर उस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा लागेल.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मी अज्ञातवासात जायला तयार आहे.'' 

महाराष्ट्रातील एकाही साखर कारखान्याने केंद्र सरकारने ठरवुन दिलेली एफआरपीची रक्कम दिलेली नाही. साखर आयुक्तांनी सांगितले की काही साखर कारखान्यांनी साठ टक्के एफआरपी दिलेली आहे. परंतु ही आकडेवारी फसवी आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी द्यावी यासाठी आम्ही साखर कारखान्यांना निवेदने दिली मात्र आजपर्यंत त्याचा काही फरकच पडलेला दिसून येत नाही असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात म्हणाले होते की शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यासाठी आम्ही राज्याची तिजोरी रिकामी करु. परंतु रक्कम मिळाली नाही. उलट न मुख्यमंत्र्यांकडे असलेले गृह खाते शेतकऱ्यांवर कारवाई करीत आहे. जे कारखाने एफआरपी देत नाहीत त्यांची साखर साखर आयुक्तांनी जप्त करावी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मी अज्ञातवासात जायला तयार आहे असेही शेट्टी यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा संयम संपल्यानेच हिंसक आंदोलन 
शेतकरीदेखील 29 रुपये किलोने साखर घ्यायला तयार आहे असे सांगून शेट्टी म्हणाले, की एफआरपी ची रक्कम एकरकमी द्यावी. साखर आयुक्तांनी ती मिळवून देण्यासाठी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांचा संयम संपल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. याला साखर कारखाने जबाबदार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com