भाजपचा अनुभव मी घेतलाय; आता उदयनराजे घेतील - राजू शेट्टी

 भाजपचा अनुभव मी घेतलाय; आता उदयनराजे घेतील - राजू शेट्टी

पुणे : भारतीय जनता पार्टीसोबत राहून मी घेतलेला अनुभव छत्रपती उदयनराजे यांना सांगितला आहे. आता त्यांना अनुभव घ्यायचा असेल म्हणून ते भाजपात गेले असावेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्यात दिली. 

सध्याचा भाजप हा मोदी आणि फडणवीस यांचा आहे. तो वाजपेयी आणि मुंडेचा पक्ष राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "" चार-पाच दिवसांपूर्वी मी छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा, असा सल्ला आपण त्यांना दिला होता.'' आज पुण्यात झालेल्या बैठकीची माहिती शेट्टी यांनी दिली. ते म्हणाले, "" शेतकऱ्यांसोबतच वंचित घटकांना घेऊन राज्यातील विविध 17 संघटनांची मूठ बांधून प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रजा लोकशाही परिषद ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत आघाडी करणार आहे. मी स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नाही. मात्र, प्रजा लोकशाही परिषद राज्यातील सर्व जागा लढवणार आहे. येत्या 20 सप्टेबरला पुण्यात या संघटनांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com