पाशा पटेलांना स्वत:च्या भवितव्यांची चिंता - राजू शेट्टी

 पाशा पटेलांना स्वत:च्या भवितव्यांची चिंता - राजू शेट्टी

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे, असे असताना भाजप - शिवसेना सत्तास्थापनेच्या केवळ चर्चा करीत आहे. अशातच राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलही कुठे दिसत नाहीत. या विषयी सिल्लोडच्या दौऱ्यावर असलेले राजू शेट्टी म्हणाले, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍ना विषयी चिंता नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. 

सिल्लोड तालुक्‍यातील नुकसानग्रस्त पिक पाहणी दौऱ्यात शेट्टी यांनी पाशा पटेल यांच्यावर टीका केली. राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे सातत्याने राजू शेट्टी यांच्यावर टीका करीत असतात. मात्र परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. यात पाशा पटेल शेतकऱ्यांच्या सोबत असायला पाहिजेत पण ते कुठेच दिसत नसल्यामुळे पत्रकारांनी राजू शेट्टींना पाशा पटेल यांच्याविषयी विचारले असताना, शेट्टी म्हणाले, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता वाटेत असेल, त्यामुळे त्यांच्या भवितव्यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्‍न महत्वाचे वाटत नसतील. याच भवितव्याच्या चिंतेत पटेल व्यस्त असतील असा टोलाही राजू शेट्टी यांनी पाशा पटेलांना लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com