महापुराचे निकष अतिवृष्टीला लावावेत - राजू शेट्टी

महापुराचे निकष अतिवृष्टीला लावावेत - राजू शेट्टी

औरंगाबाद : अडीच ते तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात महापूर आला होता. त्यावेळी शासनाने मदतीचा जो निकष लावला होता. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकष लावावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे राजू शेट्टी यांनी केली. सिल्लोड तालुक्‍यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी तालुक्‍यातील भवन, चिंचखेडा, मंगरुळ, हाट्टी, बहुली, मांडणा, उंडणगाव,गोळेगाव, लिहाखेडी आणि सारोळा या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. 

त्यानंतर माध्यामाशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, राज्यात आलेल्या महापूरातील नुकसान भरपाईसाठी शासनाने ज्यांनी पीक कर्ज घेतले होते. ते पूर्ण माफ करण्यात आले. त्यासह ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही. त्यांना आपत्ती व्यवस्थानाकडून नुकसानीच्या तिप्पट मदत जाहीर झाली आहे. ज्या प्रमाणे महापुरामुळे नुकसान झाले होते. त्याच प्रमाणे आता मराठवाड्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. यामूळे परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी महापुरांतील मदतीसाठी लागले सर्व निकष लावावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. यामूळे आता केंद्राने मदतीसाठी तात्काळ निर्णय घ्यावा असेही शेट्टी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com