शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर सत्ता उलथवून टाकू - राजू शेट्टी

 शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर सत्ता उलथवून टाकू - राजू शेट्टी

औरंगाबाद : शेतकरी व त्यांच्या मुलांना न्याय मिळाला नाही, तर राज्यातील सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथवून टाकू असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी औरंगाबादेतील शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सरकारला दिला आहे. 1977 साली तरुण, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जयप्रकाश नारायण यांनी मोठे जनआंदोलन उभे करून सत्ताधाऱ्यांना पायउतार केले होते. आम्ही देखील तुमचे तख्त पलटवण्याची क्षमता ठेवतो असेही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील फडणवीस सरकारने बेरोजगारांसाठी मेगाभरती करू असे आश्‍वासन दिले होते. सध्या मेगाभरती सुरू आहे, पण ती भाजपमध्ये इतर पक्षातील राजकीय नेत्यांची, बेरोजगारांच्या हाताला मात्र काम नाही. महाईपोर्टल सेवा ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. मध्य प्रदेशातील महाव्यापम घोटाळ्या सारखाच महाराष्ट्रात महाईपोर्टल घोटाळा आहे. यात भाजपचे कार्यकर्ते अडकले असल्याने सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केला. राज्यात तात्काळ नोकरभती करावी आणि एमपीएससी किंवा अन्य यंत्रणेच्या माध्यमातून ती करावी, पोलीस भरती देखील सुरू करण्याची आपली मागणी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

महाजनादेश यात्रा राजकारणासाठी 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात काढलेली महाजनादेश यात्रा ही केवळ राजकारणासाठी काढण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शेतकरी हिताचे काही निर्णय घेतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. आज मका पीकावर लष्करी आळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. सरकारने त्यांना तात्काळ मदत जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे. खाजगी कंपन्या यातून मालामाल झाल्या, शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळाले नाही. पीक विमा योजनेची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com