सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत माझ्या मंत्रीपदाबाबत अद्याप कसलीही चर्चा झाली नाही. आम्हाला सत्तेत घ्यावे यासाठी याचक म्हणून कटोरा घेऊन आम्ही कोणाकडेही जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज सोलापुरात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा काय अंतिम उपाय नाही परंतु आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्यायही नाही. शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये कर्जमाफी नकोय. एकदाच सरसकट कर्जमाफी द्या, पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना काही नाही दिले तरीही चालेल. आमच्या माहितीनुसार राज्यातील शेतीपंपाचे 11 हजार कोटी रुपये थकीत आहेत. विजेचा वापर नसतानाही बिलाची आकारणी झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिल माफी अथवा वीज बिलात सूट देणारी योजना सरकारने जाहीर करावी अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.