मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या वेळी पेढे वाटणारे भाजपचे नेते आहेत कुठे - राज ठाकरे यांचा सवाल

मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते कुठे आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी आज ठाण्यात बोलताना मराठा तरूण-तरूणींना राज्य सरकारने फसवल्याचा आरोपही राज यांनी केला. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या वेळी पेढे वाटणारे भाजपचे नेते आहेत कुठे - राज ठाकरे यांचा सवाल

ठाणे : मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते कुठे आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी आज ठाण्यात बोलताना  मराठा तरूण-तरूणींना राज्य सरकारने फसवल्याचा आरोपही राज यांनी केला. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. त्याबाबत राज ठाकरे बोलत होते.  ते म्हणाले, "मुलांना त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, तर त्यांच्याशी खेळ का केला? मुद्दा केंद्राचा आहे तर मग निर्णय कसे देऊ शकते? काही वर्षांपूर्वी एकाच मंचावर राजकीय पक्षांचे सगळे नेते आले होते तेव्हा मान्य केलं होतं की आरक्षण द्यायचं. मग अडलय कुठे? खासगी शाळांचा पेव मोठं आहे तिथे आरक्षण नाही. राज्यात नोकऱ्या निर्माण झाल्या आणि त्यात स्थानिकांना प्राधान्य दिलं तर राज्याला आरक्षणाची गरज लागणार नाही." 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून ते राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. आज राज यांनी राज्यातल्या दुष्काळी स्थितीचा आढावा मनसेच्या राज्यस्तरीय शिबीरात घेतला. त्यात त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  यावेळी बोलताना राज म्हणाले, "दुष्काळ आणि राज्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे शिबिर आहे. आम्ही अजून 1 लाख 20 हजार विहिरी शोधत आहोत ज्या सरकारने बांधल्या आहेत. ज्या बांधल्याने राज्यातील 29 हजार गाव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली. सरकारकडून ठोस काही येणार पण नाही.आधीच्या सरकारला शिव्या घालून सत्तेवर बसणं याव्यतिरिक्त काहीही केले नाही. सरकारने काय काम केली एरिगेशनमधून? जर 29 हजार गाव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली. मग तो पैसा कुठे गेला? हे प्रश्न मी लोकसभेच्या वेळी विचारले तर का मुख्यमंत्री उत्तर देत नाहीत."


आपल्या संभाव्य दुष्काळ दौऱ्याबाबत माध्यमांना उद्देशून बोलताना राज म्हणाले, "तुमच्याकडूनच बातमी आली की मी 10 तारखेला दुष्काळ दौरा करणार. हल्ली आम्ही ठरवायच्या आधी तुम्ही ठरवता. केवळ दुष्काळी टुरिझम करण्यात काय अर्थ? माझ्या हातात काही असतं तर ठीक. नुसतं जायचं आणि बघून यायचं, पाहून काही करू शकणार नाही हे डिप्रेसिंग आहे. मी सगळ्यांकडून माहिती घेत आहे. मग पाहू पुढे काय करायचे ते," टँकर माफियांबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "टँकर लॉबी कोणाची आहे, त्याचा पोलिटिकल कनेक्शन काय आहे, कोणा कोणाच्या आहेत हे तपासले पाहिजे. ज्या राजकीय पक्षांच्या लाॅबी आहेत त्यांचा धंदा चालला पाहिजे. तुम्हाला सहज पाही मिळालं तर त्यांचे धंदे चालणार कसे?" 


बालाकोट हल्ल्याच्या वेळी ढगांची मदत झाल्याच्या पंतप्रधानांच्या वाक्याचाही राज यांनी समाचार घेतला. ते म्हणाल, "त्यांनी  नवी टेक्नॉलॉजी आणली आहे. ते सायंटिस्ट पंतप्रधान आहे. भान सुटलं की अशी विधान करायला लागतात. देशभक्तीची सर्टिफिकेट वाटण्याचा त्यांना अधिकार नाही. नवाज शरीफला केक भरावताना त्यांनी विचार करायता होता की देशभक्ती काय आणि देशद्रोह काय?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com