मतपत्रिकेद्वारे झालेले मतदानच खरे - राज ठाकरे

 मतपत्रिकेद्वारे झालेले मतदानच खरे - राज ठाकरे

मुंबई : मतपत्रिकेद्वारे झालेले मतदान हेच खरे मतदान आहे. या मतदानात जर भाजप निवडून आला तर मी त्यांचे पुष्षगुच्छ देऊन स्वागत करेन, मात्र यापढील निवडणुका या बॅलेटद्वारेच व्हायला हव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

जगात अमेरिका, जपान, जर्मनी यासारख्या प्रगत देशांमध्ये देखील मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घेतली जाते. जगात सगळीकडे "ईव्हीएम' नाकारली गेली आहेत, केवळ आपल्या निवडणूक आयोगानेच त्याचा आग्रह धरला आहे असे सांगून त्यांनी "ईव्हीएम' मशीनपैकी 20 लाख मशीन सापडत नसल्याचा आरोप केला. " ग्रेट हॅक' नावाची डॉक्‍युमेंटरी तुम्ही आवर्जून पहा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. 

केंद्रातील मोदी सरकारवर व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. आता निवडणुका आल्या की भाजपला राममंदिर आठवेल ते पुन्हा एखादे मंदिर उभारणीच्या घोषणा देतील त्यावर विश्‍वास ठेवू नका अशे आवाहन त्यांनी केले. देशात मंदिरांची कमतरता नाही पुन्हा एक रामंदिर उभारण्याची गरजच काय ? असा सवालही त्यांनी केला. "ईव्हीएम'च्या विरोधात निघणारा सर्वपक्षीय मोचा4 21 तारखेला निघणार होता मात्र तो आता पुढे ढकलला असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोर्चाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com