उद्धव ठाकरे `तारखे`वर येताच राज यांनी `तिथी` पकडली

...
उद्धव ठाकरे `तारखे`वर येताच राज यांनी `तिथी` पकडली

औरंगाबाद : भाजपने औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा हायजॅक करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवजयंती ही तिथीनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शिवजयंतीला राज ठाकरे औरंगाबाद येथे हजेरी लावणार आहेत.

औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर  काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत असताना, हातात भगवा धरणाऱ्या मनसेकडून ती पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न होत आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या तयारीसाठी `कृष्णकुंज`वर मनसे नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. 
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी 12 मार्चला राज ठाकरे स्वतः औरंगाबादला जाणार आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तारखेनुसार शिवजंयती साजरी केली. त्यामुळं शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेनं ही खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आज मनसे नेत्यांची महत्वाची बैठक झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजित पानसे, अविनाश जाधव यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटायला कृष्णकुंजवर आले होते. यावेळी औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे नेते, पदाधिकारी यांना दिले.

मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांनी 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर येत शिवजयंती साजरी केली होती. शिवजयंती तारखेने साजरे करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय या आधीच झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com