मोर्चेबंदीच्या विरोधातील  केसमधून राज ठाकरे सुटले

मोर्चेबंदीच्या विरोधातील  केसमधून राज ठाकरे सुटले

मुंबई : पोलीसांवर व पत्रकारांवर रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आझाद मैदान येथे मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा काढला होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. याप्रकरणी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील दाखल झालेली केस व एफआयआर रद्द करण्यात आले आहेत. 

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आझाद मैदान येथे 2012 साली मोर्चा काढला होता. पण, या मोर्च्याला परवानगी नसल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, ही तक्रार 2014 साली दाखल करण्यात आली होती. त्यामुळे सुनावणी दरम्यान तारखेमध्ये तफावत आढळल्यास हे प्रकरण ग्राह्य धरले जाणार नाही, असे न्यायालयाने सरकारी पक्षाला सुनावले होते. त्याप्रमाणे दाखल केली गेलेली केस ग्राह्य धरली गेली नसल्यामुळे याप्रकरणी राज यांना दिलासा मिळाला, अशी माहिती मनसेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या ऍड. राजेंद्र शिरोडकर यांनी 'सरकारनामा' ला दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com