लातूर : ``मी आशावादी असून ऑगस्ट अखेर परतीचा पाऊस लातूर व परिसरात नक्कीच चांगला होणार आहे. तसा आजतागायतचा इतिहास आहे. यामुळे रेल्वेने पाणी येणार नाही. पाणी पावसाचे येणार आहे,`` असा विश्वास लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची मोठी तीव्रता जाणवत आहे. चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. लातूर जिल्ह्याला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी आणण्याच्या हालचाली बाबतीत ऑगस्ट महिना अखेर निर्णय घेण्यात येईल, घेण्यात येत असे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले होते. मात्र पालकमंत्र्यांनी तसा विचार नसल्याचे स्पष्ट केले.
माझा देवावर विश्वास असल्याचे पालकमंत्र्यानी जाहीर केल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. चालू वर्षीच्या पावसाळ्यात अल्प पावसामुळे नद्या धरण कालवे कोरडे पडले आहेत. लातूरला रेल्वेन पाणी येणार नसल्याचे विधान केल्याने आगामी काळातील जुन २०२० पर्यंत पाणीपुरवठा कसा होईल, हाच मोठा प्रश्न आहे
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.