अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या : खासदार राहुल शेवाळेंची मागणी

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या : खासदार राहुल शेवाळेंची मागणी

मुंबई : कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत  शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याच वेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णा भाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे.

अण्णा भाऊ यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन सरकारने अभिवादन करावे, असे शेवाळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com