राहुल गांधी मेहनत करणारा नेता : संघाचे मा. गो. वैद्य यांच्याकडून कौतुक

राहुल गांधी मेहनत करणारा नेता : संघाचे मा. गो. वैद्य यांच्याकडून कौतुक

नागपूर : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह लावता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्लेषण केले.

गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपच्या आयटी सेलद्वारे तसेच संघ परिवारातून टिकेची झोड उठविली जात होती. त्यांच्यावर उपहासात्मक व चारित्र्यहणन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या जात होत्या. तसेच त्यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मा. गो. वैद्य म्हणाले, कॉंग्रेसला मेहनत करणारा नेता मिळाला आहे. ही कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ राहण्याची आवश्‍यकता आहे. एका पक्षाचा प्रभाव हा लोकशाहीसाठी हितकारक नाही. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांमध्ये कॉंग्रेसचा विजय हा लोकशाही सुदृढ असल्याचे लक्षण आहे. एकाच पक्षाची फार काळ सत्ता राहणे योग्य नाही. यातून लोकशाही सबळ होत नाही.
 
तीन राज्यांमध्ये झालेल्या धक्कादायक पराभवातून भाजपच्या नेत्यांनी काय धडा घ्यावा, असे विचारले असता ते म्हणाले, मी त्यांना काय सांगणार? अध्यक्ष बदलावा की नाही, ही भाजपची अंतर्गत बाब आहे. याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com