राहुल गांधीसह विरोधीपक्षाच्या नेत्यांना श्रीनगरमधूनच परत पाठविले 

राहुल गांधीसह विरोधीपक्षाच्या नेत्यांना श्रीनगरमधूनच परत पाठविले 

श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील नेते डी.राजा, शरद यादव आदी नेत्यांना आज श्रीनगर विमानतळावरून परत दिल्लीला पाठविले. 

विरोधी पक्षाच्या नेत्यांना राज्यात प्रवेश देण्यास परवानगी नाकारली आहे. कायदा सुव्यवस्था हे त्यासाठी कारण देण्यात आले आहे. हे सर्व नेते दिल्लीहून श्रीनगर विमानतळावर पोचले असतान त्यांना रोखण्यात आले.

सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आलं. "एएनआय' ने याबाबत माहिती दिली आहे. या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार कलम 370 रद्द झाल्यानंतर राहुल यांनी काश्‍मीरचा दौरा करण्याचे ठरवले होते. मोदी सरकारने रद्द केलेल्या या कलमाला त्यांनी कडाडून विरोध केला होता. 

राहुल यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, डी राजा, शरद यादव, मनोज झा, माजिद मेमन आदी नेते होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com