शेतकरी संघटनांमध्ये विविध राजकीय पक्षांनी फूट पाडली - रघुनाथदादा पाटील

 शेतकरी संघटनांमध्ये विविध राजकीय पक्षांनी फूट पाडली - रघुनाथदादा पाटील

पुणे : कॉंग्रेस राष्ट्रवादीने शेतकरी संघटनेत फूट पाडली तर भाजपने आमच्यातील काहींना लाचार बनवले आणि त्यांच्याबरोबर जे गेले त्यांच्यातही भांडणे सुरू झाली. एका जीवाने रहात होते पण पटलं नाही, त्यांच्यातही भाजपने भांडणे लावली. मोह सगळ्यात वाईट आहे, मोहापुढं साक्षात विश्वामित्रसुद्धा बळी पडला आणि हे तर काय ? किस झाड की पत्ती? अशा शब्दात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. 

शेतकरी संघटना बलवान होऊ नये म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले. आमच्यात गैरसमज निर्माण केले. फूट पाडली. आमची संघटना बळकट झाली तर त्याना हादरा बसेल अशी भीती होती. त्यानी आमच्यातील शक्तीचे विभाजन केले. त्यानंतर आमच्यातील काहीजण भाजपच्या अच्छे दिनाला भुलले, तिकडे गेले. सत्तेसाठी लाचार झाले. तिथं त्यांच्यात भाजपने फूट पाडली. ते आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटू लागले आहेत. मोह माणसाला काहीच सुचून देत नाही. विश्वामित्रासारखा ऋषी मोहाला बळी पडला हे तर किस झाड की पत्ती? असेही पाटील म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com