शेतकऱ्यांच्या बाजूने असाल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाका!

उंदराचे ही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजप वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत.
शेतकऱ्यांच्या बाजूने असाल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाका!

पुणे: ''भाजप सरकार जर शेतकऱ्यांच्या बाजूंचे असेल तर त्यांनी वाघाची बाजू घेणाऱ्या मनेका गांधी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. मनेका गांधीनी वाघाची बाजू घ्यायची आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं हा काय प्रकार आहे? तुमच्यात तरी मेळ आहे का?"असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

ते म्हणाले,"भाजपमध्ये कसलाही मेळ राहिलेला नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना त्यांनी प्राणीमित्रांच्या बाजूने बोलायला लावले आहे आणि इथले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. म्हणजे उंदराचे ही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजप वाले जनतेला मूर्ख बनवत आहेत. त्यांना जर खरोखर शेतकऱ्यांची बाजू घ्यायची असेल तर त्यानी गांधी यांना आजच्या आज मंत्रिमंडळातून काढून टाकावे. सुधीर मुनगंटीवार हे जरी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत असले तरी १३ लोक मारेपर्यंत ते गप्प का बसले होते, पहिला माणूस मारला तेव्हाच वाघ कां मारला नाही?"असाही सवाल पाटील यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com