सोलापूर : ‘‘आजवर सरकार बदलली, पण धोरणे बदलत नाहीत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वरचेवर वाढतच आहेत,’’ अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. या सर्व प्रश्नाला सर्वाधिक काळ सत्ता भोगणारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘‘पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याकाळी शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तीच भूमिका आज मोदी सरकारही घेते आहे. आर्थिक धोरणे पूर्णपणे शेतकरी विरोधी आहेत. शरद पवार हे तर गेली अनेक वर्षे केंद्र आणि राज्याच्या सत्तेत होते. पण, तेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.